७६० कोटींच्या निधीची आणला, ही वचनपूर्ती संघातील जनतेला भेट – आमदार मनोज घोरपडे
१ कोटी २३ लाख ६५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर मतदार संघात एका वर्षात ७६० कोटीचा निधी आणला, ही वचनपूर्ती व वर्षपूर्तीची मतदार संघातील जनतेला भेट असून, पाच वर्षांत पाच हजार कोटींचा निधी आणणारच. मसूरच्या व्यापारी पेठेला जोडणाऱ्या जुन्या पुलासाठी येत्या अर्थसंकल्पात ३ ते ४ कोटी रुपये मंजूर करून आणण्याबरोबरच इतर मागण्याही पूर्ण केल्या जातील. कराड उत्तरची इंच न इंच जमीन ओलिताखाली आणणार, असे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी केले.
येथील १ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांच्या मंजूर विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोयना दूध संघाचे माजी अध्यक्ष संपतराव इंगवले, माजी जि. प. सदस्य नंदकुमार जगदाळे, उद्यानपंडित दिनकराव पाटील, युवा नेते कुलदीप क्षिरसागर, पवन निकम, ओंकार जगदाळे, प्रशांत यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार घोरपडे म्हणाले, खासदारकी व आमदारकी जशी एक विचारांची झाली. तशी येऊ घातलेली जिल्हा परिषद व पंचायत समिती एक विचारांची करून सर्वच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य निवडून आणणारच, कारण माझे सोबत जनता आहे. असा शब्द मी पक्षश्रेष्ठींना देतोय त्यामुळे सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्याची जबाबदारी तुम्हा मतदारांची आहे.
ते म्हणाले, गत ३५ ते ४० वर्षात हणबरवाडी – धनगरवाडी योजना ऐकत होतो. पण एकाच वर्षात त्याला आपण गती दिली. पहिल्या टप्प्याचे पाणी लवकरच सुरू करतोय.
प्रास्ताविक पर भाषणात जयवंत जगदाळे यांनी ग्रामीण रुग्णालय, जुन्या बाजारपेठेत जोडणारा महत्वपूर्ण पूल तसेच बाजारपेठ ते स्मशानभूमी रस्ता व स्टेटलाईट व्हावी, अशी मागणी केली. यावेळी दिनकरराव पाटील, उमेश साळुंखे, नंदकुमार जगदाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ॲड. उदयसिंह जगदाळे, संजय शिरतोडे, सुनीलदादा दळवी, सुमित शहा, जितेंद्र मोरे, अण्णाजी यादव, रविंद्र यादव, संदीप सावंत, सचिन यादव, संभाजी इंगवले, सरपंच वैशाली माळी, पायल जाधव, धीरज जाधव, संभाजीराजे बर्गे, विश्वजीत जगदाळे, शिवाजीराव नांगरे- पाटील, राजन पाटील, गणेश घारगे, सुभाषराव पाटील, वामनराव साळुंखे, दिगंबर भिसे, प्रशांत घोलप, शरद घोलप उपस्थित होते. प्रास्ताविक जयवंत जगदाळे यांनी केले. सूत्रसंचालन आशिष मोहिते यांनी केले. तर युवा नेते ओमकार जगदाळे यांनी आभार मानले.
कोणेगाव व कवठेतील नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश
मसूर गटातील विशेषत: वडोली भिकेश्वर गणातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कोणेगाव व कवठे गावातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी मसूरच्या कार्यक्रमात जाहीर भाजप प्रवेश केला, हा कार्यक्रम स्थळी मोठा चर्चेचा विषय ठरला होता.
कोणीही नाराज होऊ नका…
मसूरकरांनी एकत्र बसून कोणा एकाला तिकीट द्यायची ते सांगावे. मात्र कोणी नाराज होऊ नका, कारण जिल्हा परिषद व पंचायत समितीला तीन-चार जणांना क्राफ्ट करून घेता येणार आहे. त्यामुळे त्यांचाही सन्मान होईल, हे लक्षात घेऊन सर्वांनी एकजूट दाखवून एकच नाव सुचवावे, असे आवाहन त्यांनी केले.



