नव्या पिढीने मानवतेच्या सेवेसाठी योगदान द्यावे – डॉ भरत वातावणी

कराड / प्रतिनिधी : –
मानवाची सेवा करणे म्हणजे परमेश्वरांची सेवा आहे. ही सेवा करताना दुःख आहे. या दुःखालाही सीमा नाही. पण मानवता समजून सेवा केली पाहिजे.या सेवेला सीमा नाहीत. याची भान ठेवून नव्या पिढीने मानवतेच्या सेवेसाठी स्वतःचे योगदान द्यावे हीच खरी देशभक्ती आहे असे प्रतिपादन रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेते मानसोपचार तज्ञ डॉक्टर भरत वतवांनी यांनी व्यक्त केले.
उंडाळे ता. कराड येथे थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय दादासाहेब उंडाळकर यांच्या ५१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ४२ व्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व माजी सैनिक मेळाव्यात त्यांना यावर्षीचा दादा उंडाळकर समाज पुरस्कार माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यातआला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कार्यक्रमाचे संयोजक ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर ,विश्वस्त गणपतराव कणसे, विजय पाटील, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल मोहिते ,कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, निवृत्ती सैनिक संघटनेचे प्रशांत कदम, माजी सभापती आप्पासाहेब गरुड, वसंतराव जगदाळे या मान्यवर उपस्थित होते.
भरत वतवाणी यांनी समाजात आज दहा लाखापेक्षा अधिक लोक मनोरुग्ण आहेत. त्यापैकी फक्त ११००० मनोरुग्णांवर आमच्या श्रृद्धा सेवाभावी संस्थेकडून उपचार झाले आहेत. बाकीच्या मनोरुग्णांचे लोकांचे काय ? असा प्रश्न करून या कामासाठी समाजातील अर्थसंपन्न व चांगल्या लोकांनी मानवसेवेला समर्पित होऊन कोणताही जात, धर्म, पंथ, बाजूला ठेवून सम समर्पित भावनेने आपण सर्वजण एक आहोत ही भावना ठेवून काम करणे गरजेचे आहे. एक चांगला भावनिक सद्भावना पूर्ण देश बनवा असे आवाहन करून स्वातंत्र्य सैनिकांनी कोणतीही अपेक्षा न करता स्वातंत्र्य लढ्याला झोकून दिले होते. त्यांना कधीही अपेक्षित नव्हते की भविष्यात आपले नाव अमर राहील. पुतळे उभारले जातील. तरीही त्यांनी मानवतेच्या भूमिकेतून काम केले होते .
स्वर्गीय दादा उंडाळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण स्मारक समितीचा ऋणी आहे स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र सैनिकांच्या भूमित त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा अभिमान व आनंदा असल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
माझी खासदार निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आपल्या कारकीर्दीत चार हजार पेक्षा अधिक दहशतवाद्यांना भारतीय सैन्यात भरती करून भारताचे सैन्य बनवले हा माझ्या जीवनातील सर्वोच्च क्षण आहे सातारा जिल्हा कराड तालुका स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिकांची पंढरी आहे या जिल्ह्यात माजी सैनिकांचे मेळावे घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेत त्यांचा सन्मान केला जातो ही सैनिकांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद गोष्ट आहे. हा उपक्रम दादा उंडाळकर स्मारक समितीने राबवला. तो उपक्रम स्तुत्य असून माजी सैनिकांनी सेवेत भरती होताना भारतीय संविधानाला स्मरुण देशसेवेची शपथ घेतली होती त्या संविधान शपथेप्रमाणे सेवानिवृत्तीनंतरही माजी सैनिकांनी देशसेवा व समाजसेवा करावी असे आवाहन केले. विलासराव पाटील उंडाळकर यांनी आपल्या ३५ वर्षाच्या कारकिर्दीत माजी सैनिकांच्या प्रश्नासाठी मोठे योगदान दिले अशी आठवणी करून दिली.
डॉ .भरत वतवांनी यांना यावर्षीचा स्वा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला 50 हजार रुपये रोख सन्मानपत्र शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे डॉ. भरत वतवाणी यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन स्मारक समितीचे विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे यांनी केले