आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळेच्या हस्ते ग्राम परिक्रमा अभियानाची 13 मार्च रोजी सांगता- रामकृष्ण वेताळ

कराड / प्रतिनिधी :-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबवून प्रयत्न केले आहेत. शासनाच्या या शेतकरी हिताच्या योजनांची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राम परिक्रमा अभियानाची सुरुवात केली होती. भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे तात्या यांच्या यशस्वी नेतृत्वात पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्राम परिक्रमा अभियान सुरू करण्यात आले होते. अशी माहिती प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी दिली.
मागील महिनाभर हे ग्राम परिक्रमा अभियान पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू होते. गावोगाव जाऊन या परिक्रमे अंतर्गत नरेंद्र मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत होती. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यातील ग्राम परिक्रमा पूर्ण झाली असल्याने याचा सांगता समारंभ बेलवाडी ता. कराड या ठिकाणी आज दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजतासंपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार छ. उदयनराजे भोसले, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे (तात्या), आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे,प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य भरत पाटील ,किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
हा सांगता समारंभ जय हनुमान करिअर अकॅडमी, तारगाव रोड बेलवाडी सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, नेते,कार्यकर्ते व शेतकरी बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

ग्राम परिक्रमा अभियानाचे सफल आयोजन.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेचे आयोजन केले होते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील गावागावात ही यात्रा पोहोचली आहे. शेतकरी हितांच्या सर्व योजनांची माहिती गावोगाव पोचवली आहे. या सफल अशा परिक्रमा यात्रेची सांगता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बेलवाडी ता. कराड येथे होत आहे. रामकृष्ण वेताळ सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र

Related Articles