सातारा जिल्हाहोम

कोयनेचे दरवाजे सायंकाळपासून दीड फुटाणे उचलणार 

नदीपत्रात 12,100 क्युसेकने करणार विसर्ग; पायथा वीजगृहातूनही सोडणार पाणी, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

कराड/प्रतिनिधी : –

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची संततधार सुरू झाल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा शतकाच्या उंबरठ्यावर असून जाल्पातली नियंत्रित करण्यासाठी आज दि. 27 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून धरणाचे दरवाजे 1.3 फुटांनी उचलून नदीपात्रात 12,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच पायथा वीजगृहातूनही पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोयना धरण पाणीसाठा पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे धरणाची वाढती जलपातळी नियंत्रणात आणण्यासाठी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे प्रयोग आजपासून सुरू करण्यात येणार  आहेत. त्यानुसार धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वीत करण्यात येणार आहे. त्यानंतर जलपातळी नियंत्रीत न आल्यास धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग करण्याचा निर्णय कोयना व्यवस्थापनाने घेतला आहे.

गत 24 तासांत कोयनानगर येथे 136 मिमी, नवजा 139 मिमी, महाबळेश्वर येथे 142 मिमी पाव साची नोंद झाली आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 38,271 क्युसेक बनल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5 टीएमसीने वाढ झाली असून पाणीसाठा 98.89 टीएमसी झाली आहे. धरणातील पाणीसाठा शतकाच्या उंबरठ्यावर असून धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 7 टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे.

Related Articles