सातारा जिल्हाहोम

दोन वर्षांत बाबरमाचीचा बॅकलॉग भरून काढणार – आ. मनोज घोरपडे

बाबरमाची येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

कराड/प्रतिनिधी : –

गेली पंचवीस वर्षांत बाबरमाची गावच्या विकासकामाचा जो बॅकलॉग राहिला आहे, तो येत्या दोन वर्षांत भरुन काढणार आहे. पुर्वीच्या लोकप्रतिनिधींनी पाच-दहा लाख रुपये देऊन लोकांना केवळ झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. परंतु, मला लाखात नव्हे; तर कोटीत मागा, तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची क्षमता ठेवावी लागेल, असे प्रतिपादन आ. मनोजदादा घोरपडे यांनी केले.

बाबरमाची (ता. कराड) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय कदम, महेश जाधव, पै. हिंदकेसरी संतोष वेताळ, राहुल पाटील-पार्लेकर, कामगार नेते नवनाथ पाटील, शिवसेनेचे विनायक भोसले, बाबुराव धोकटे, कोयना दूध संघाचे व्हा. चेअरमन अशोक नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. घोरपडे म्हणाले, ग्रामपंचायतीला विकासंकामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मर्यादा येतात. आज केंद्रात भाजपचे आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होण्यासाठी पंचायत ही महायुतीच्या विचाराची असावी, म्हणून महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. बाबरमाची गावच्या विकासनिधीने चार महिन्यांतच कोटीचा आकडा पार केला आहे. आपण सामान्य माणसांची कामे करताना कधीही पक्ष, पार्टी बघत नाही. माझ्याकडे काम करताना पुर्वीच्या लोकप्रतिनीधींप्रमाणे कोणाच्याही शिफारशीची गरज नाही. लोकांच्या शेतासाठी आपण कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नवनाथ पाटील, संतोष वेताळ, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कदम यांनी केले. यावेळी शिवाजी डुबल, सतिश डांगे, अतुल पवार, संभाजी पिसाळ, यशवंत डुबल, अरविंद यादव, नावडकर, मोहन चव्हाण, निलेश डूबल यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

कराड उत्तर विकासापासून खूप मागे

बिनकामाच्या माजी आमदारांमुळे कराड उत्तर मतदारसंघ विकासापासून खूप मागे राहिला आहे. या मतदारसंघाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी भरपूर काम करावे लागणार आहे. प्रमुख रस्त्याची व सिंचन प्रकल्पांची कामे जवळपास मार्गी लावण्यात आपण यशस्वी झालो असून येणाऱ्या दिवसांमध्ये गावातील अंतर्गत कामांवर भर द्यावा लागणार असल्याचे यावेळी आ. घोरपडे यांनी सांगितले.

Related Articles