उज्ज्वल भवितव्यासाठी यशाचा संकल्प आणि परिश्रमातील सातत्य महत्वाचे- प्रा. गोपीचंद चाटे

कराड / प्रतिनिधी : –
जो शिक्षणाचा आदर करतो त्याचा सर्वत्र आदर होतो. हे युग स्पर्धात्मक युग आहे. परिपुर्णता हेच तर स्पर्धा परीक्षेचे खरे गमक आहे. परिपूर्णता असेल तरच स्पर्धापरीक्षेत यश मिळवता येते. विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी यशाचा संकल्प आणि परिश्रमातील सातत्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक गोपीचंद चाटे यांनी केले.
चाटे शिक्षण समूह कराडचे वतीने ‘झेप यशाची प्रेरक विचार प्रेरणादायी संवाद या शैक्षणीक कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकमाची सुरुवात सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने झाली त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यकमाचे प्रमुख मार्गदर्शक चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष प्रा. गोपीचंद चाटे मार्गदर्शनपर भाषणात चाटे शिक्षण समूहावद्दल बोलताना म्हणाले, चाटे शिक्षण समूहचा प्रत्येक विद्यार्थी हा सक्षम झाला पाहिजे आपले कर्तुत्व आपल्या पालकांना अभिमान वाटेल असेच असावे. या स्पर्धेत चाटेच्या प्रत्येक विद्यार्थी उत्तरला पाहिजे त्यासाठी इयत्ता ८ वी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी समोर