सातारा जिल्हाहोम

मनोज घोरपडे हेच खरे जल आणि जननायक – वसंतराव जगदाळे

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तरचा दुष्काळ मिटवण्यासाठी अल्पावधीमध्ये मनोज घोरपडे यांनी हणबरवाडी-धनगरवाडी उपसा सिंचन योजना, पाल इंदोली उपसा योजना, टेंभू योजना, गणेशवाडी उपसा सिंचन योजना, समर्थ गाव सिंचन योजना, काशीळ उपसा सिंचन योजना यासारख्या योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल बघता मनोज घोरपडे हेच खरे जलनायक आणि सर्वसामान्यांच्या प्रति काम करणारे जननायक आहेत. असे गौरवोदगार वसंतराव जगदाळे यांनी काढले.

निगडी (ता. कराड) येथे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी हणबरवाडी-धनगरवाडी योजनेसाठी 202.74 कोटी रुपयांची सुप्रमा केल्याबद्दल निगडी ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या वतीने आमदार घोरपडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार मनोज घोरपडे, महेश जाधव, संपतराव इंगवले, दिनकर पाटील, प्रदीप साळुंखे, कुलदीप क्षीरसागर, तुकाराम नलवडे, पुनमताई कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. जगदाळे म्हणाले, आजपर्यंत कराड उत्तरचे नेतृत्व अनेक नेत्यांनी केले. परंतु, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर खऱ्या अर्थाने जननायक म्हणून आमदार मनोज घोरपडे यांच्या रूपाने उत्तरेला नेतृत्व मिळालेले आहे. माजी आमदारांनी गेली 25 वर्ष हणबरवाडी-धनगवाडी योजना रखडवली होती. ती योजना केवळ 25 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मनोज घोरपडे यांनी ठेवले आहे. त्यामुळे त्यांना जलनायक म्हणणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर जनता दरबार आणि स्वतःच्या संपर्काच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य लोकांना भेटून त्यांची काम करण्याची पद्धत पाहता, मतदारसंघातील लहानांपासून थोरांपर्यंत त्यांचे चाहते निर्माण झाले आहेत. जनसामान्यांचे नेते म्हणूनही त्यांचे नाव सर्व मतदारसंघामध्ये आदराने घेतले जाते, असेही त्यांनी सांगितले.

आमदार मनोज घोरपडे म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक विकासकामे रखडलेली, तसेच अनेक पाणी योजना रखडलेल्या होत्या. प्रामुख्याने लोकांना पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याची व्यवस्था करणे, तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचून जनतेची कामे करणे, हेच माझे कर्तव्य असून त्याच पद्धतीने काम करणार आहे. माझ्याकडे येण्यासाठी कोणालाही मध्यस्थीची गरज भासणार नाही, याचे मी वचन देतो.

यावेळी रसिक पाटील, पवन निकम, संजय शिरतोडे, भीमराव घोलप, विजय घोलप, प्रशांत घोलप, मारुती घोलप, संदीप पानसकर, वैभव साळुंखे, संभाजी माने, अशोक जाधव, ओमकार जगदाळे, महेश चव्हाण, गणेश जाधव, सागर जगदाळे, संदीप चव्हाण, उमेश साळुंखे, चंद्रकांत पाटील, शिवाजी घोलप, लक्ष्मण घोलप, विनोद नेटके, किरण माने, सागर कुंभार, निवास घोलप, फर्स्ट घोलप, महेश पवार, सागर घोलप, उत्तम घोलप, पांडुरंग घोलप, रामचंद्र माने, शशिकांत घोलप, सुभाष घोलप, संभाजी माने, संतोष पाटील, कपिल पाटील, रमेश सुतार आणि निगडी गावातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

निगडी गावचे चेअरमन शरद घोलप, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण घोलप, मोहन घोलप, आप्पासो पवार (माजी चेअरमन पाडळी), अभिजीत पाटील (कालगाव), शिवाजी घोलप (घोलपवाडी), व्हा. चेअरमन सुभाष घोलप आदी शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

Related Articles