आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्र

सुनील आटपाडकर यांची एजेएफसी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

सात जून ला पनवेल येथे होणार गौरव सोहळा

 

मुंबई/ प्रतिनिधी :-

देशातील अग्रणी पत्रकार संघटना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल चे (एजेएफसी) यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले असून विविध क्षेत्रातील 10 मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय शासकीय अधिकारी पुरस्कार हा एमएमआरडीए च्या सामाजिक विकास कक्ष विभागाचे सहाय्यक सामाजिक विकास अधिकारी सुनील आटपाडकर यांना जाहीर झाला आहे. 2005 साली पत्रकारिता क्षेत्रातील समविचारी दिग्गज पत्रकारांनी एकत्र येत या संघटनेची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे या संघटनेत पत्रकारांसह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा देखील समावेश आहे. एजेएफसीच्या स्थापनेपासूनच वार्षिक संमेलन कार्यशाळा तसेच पुरस्काराचे आयोजन केले जाते हे पुरस्कार पत्रकार तेथील ज्येष्ठ पत्रकार यांना दिले जात होते परंतु समाजातील इतर घटकांचा देखील संघटनेत समावेश असल्याने हे पुरस्कार सर्व समावेशक करण्यात आले आहेत.

एजेएफसी च्या पुरस्कार निवड समितीमार्फत दोन महिन्यांपूर्वी पुरस्कारांच्या नामांकनसाठी आव्हान केले जाते यामध्ये विविध पुरस्कारांसाठी शेकडो नामांकन प्राप्त होत असतात त्यातूनही निवड समिती विशेष अशा मान्यवरांचा पुरस्कारासाठी निवड करत असते. राज्यस्तरीय शासकीय अधिकारी या पुरस्कार प्रवर्गातून देखील तेरा नामांकन प्राप्त झाले होते परंतु सुनील आटपाडकर यांची निवड एकमताने मंजूर होऊन त्याची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कार घोषणामुळे सुनील आटपाडकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

मुंबईच्या शाश्वत विकासासाठी सरकारने एमएमआरडीए प्राधिकरणाची स्थापना केली यामध्ये मुंबई शहराचे आधुनिकीकरण हा मुख्य हेतू होता. आज मुंबईचे आधुनिक रूप पाहता तो हेतू पूर्णता साध्य झाल्याचे लक्षात येते. या आधुनिकीकरणातील मूळ प्रक्रिया म्हणजे प्रकल्पासाठी क्षेत्र संपादित करणे व त्या क्षेत्रातील नागरिकांचे योग्य पुनर्वसन करणे होय. 1972 नंतर मुंबईने आधुनिकीकरणाचा वेग धरला व 2014 नंतर आश्चर्यकारिता मुंबईमध्ये फार मोठे प्रकल्प उभे राहिले यामध्ये मेट्रो, मोनोरेल अटल सेतू, भुयारी मार्ग अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी क्षेत्र संपादित केलेल्या लोकांचे पुनर्वसन प्रक्रियेमध्ये सामाजिक विकास कक्ष या विभागाची मोठी जबाबदारी आहे.

एमएमआरडीए प्राधिकरणाच्या जुन्या प्रशासकीय इमारतीत तिसरा मजल्यावर सामाजिक विकास कक्षा चे कार्यालय आहे. हे कार्यालय दुपारनंतर नागरिकांच्या गर्दीने भरगच्च राहते त्यातही सुनील आटपाडकर यांचे दालन नेहमीच प्रकल्पातील रहिवाशांनी भरलेले असते. पुनर्वसन झाल्यानंतर काही त्रुटी अथवा सुविधांसाठी प्रकल्पातील इमारतींच्या अध्यक्ष सचिव व वैयक्तिकरित्या रहिवाशी देखील त्यांच्याकडे येत असतात विशेष म्हणजे सर्व रहिवाशांना भेटण्यासाठी ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत कार्यालयात असतात. एखाद्या अधिकाराचे कार्य हे त्याच्याकडे असलेल्या फाईलवरून ओळखले जाते अशी शासकीय म्हण रूढ आहे. सुनील आटपाडकर यांचे दप्तर सुद्धा फाईलचे गोदाम आहे की काय असा प्रश्न पडतो.

एमएमआरडीए प्राधिकरण फक्त रहिवाशांच्या पुनर्वसनाची जबाबदारी असताना देखील आज सुनील आटपाडकर यांनी माणुसकीच्या नात्याने पुनर्वसनाची व्याख्या तंतोतंत खरी ठरवल्याचे ‘संकल्प’ सारख्या बचत गटावरून दिसून येते. आज मी ती संकल्प बचत गटात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हजाराहून जास्त महिलांचा समावेश असून बचत गटामुळे त्यांची उपजीविका भागत आहे तसेच काही महिला या उद्योजक म्हणून सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून पुढे आले आहेत. याचे श्रेय सुनील आटपाडकर यांनाच जाते. आज एमएमआरडीए रहिवाशी प्रकल्पातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सुनील आटपाडकर हे निमंत्रित असतात व ते उपस्थित ही असतात हीच त्यांच्या कर्तव्याची पावती समजावी लागेल.

7 जून रोजी पनवेल येथील आद्य क्रांतिकारक बळवंत वासुदेव फडके सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 3 च्या दरम्यान पुरस्कार प्रदान चा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुणे, खासदार रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे,आमदार महेंद्र दळवी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, बाळासाहेब पाटील सह इतर राजकीय व सामाजिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Related Articles