महाराष्ट्रसातारा जिल्हा

वारुंजी सोसायटीच्या चेअरमनपदी विक्रम चव्हाण यांची बिनविरोध निवड

कराड/प्रतिनिधी : –

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रयत सहकारी साखर कारखाना चेअरमन उदयसिंह पाटील, तसेच माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारुंजी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी विक्रम चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक अधिकारी सौ. थोरात मॅडम यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी कराड शेती उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती संभाजी चव्हाण, बाळासाहेब पाटील, विकास सोसायटीचे संचालक मुकुंद पाटील, गणेश पाटील, धनंजय पाटील, विजयकुमार पाटील, जयवंत पाटील, गणी सुतार, सुरेश पवार, दीपक भंडलकर, आनंदराव थोरवडे, श्रीमती सुमन पाटील, श्रीमती सुनंदा धुमाळ यांच्यासह बाळासाहेब चव्हाण, महादेव पाटील, तानाजी देशमुख, जगन्नाथ पाटील, मोहन पाटील, अण्णा पाटील, वृषसेन चव्हाण, अशोक पाटील, राहुल चव्हाण, महेश पाटील व सभासदांची उपस्थिती होती.

Related Articles