न्यायालयाचा निर्णय काहीही असो; मागे हटणार नाही – निवासराव थोरात

कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून काहींनी जाणीवपूर्वक माझा अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केल्यानंतर सहकार आयुक्तांकडे याबाबत दाद मागितली. यात त्यांनी अर्ज वैद्य ठरवला. परंतु, त्यानंतरही त्यावर हरकत घेतल्याने याबाबत न्यायालयाकडे दाद मागितली होती. मात्र, त्यांनी अनेकवेळा याबाबाचा निकाल राखून ठेवला. या प्रक्रियेत माझा उमेदवारी अर्ज वैद्य किंवा अवैध ठरला, तरीही आपण ही निवडणूक जोमाने लढवणार असून विजय खेचून आणणार असल्याचा विश्वास स्व यशवंतराव चव्हाण सह्याद्रि स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचे प्रमुख निवासराव थोरात यांनी व्यक्त केला.
या न्यायालयीन लढ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्च्याचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री थोरात म्हणाले, न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय मान्य केला असून साखर सह आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती दिल्यादिली असल्याचे समजले आहे. परंतु, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, माझ्या उमेदवारी अर्जाबाबत न्यायालयाचा निकाल काहीही येवोत, परंतु, आता मागे हटणार नाही. धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांच्या साथीने ही निवडणूक जोमाने लढवणार असून यामध्ये विजयश्री खेचून आणणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात कारखाना कार्यक्षेत्रात जोमाने प्रचार करून मतदारांसमोर सर्व हकीकत मांडणार आहे. कारखान्याच्या सभासद, शेतकरी सुज्ञ आहेत. त्यामुळे ते कोणत्याही दबावाला बळी न पडता नाहीत. ते प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.