सातारा जिल्हाहोम

बदलाच्या दृष्टीने ‘सह्याद्रि’च्या सभासदांची वाटचाल – आमदार मनोज घोरपडे

विद्यमान चेअरमनांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप

कराड/प्रतिनिधी : –

‘सह्याद्रि’चे वारे आता बदलाच्या दिशेने वाहू लागले आहे. ही निवडणूक सभासदांनीच हातात घेतली असून विद्यमान चेअरमनांनी माफी नामे लिहून घेतल्याचे सभासद विसरले नाहीत. जाणीवपूर्वक वारस नोंदी टाळल्या. कामगारांचा खासगी कामांसाठी गैरवापर केला. गेल्या ३०-४० वर्षांत सह्याद्रि कारखान्यात ७०-८० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केला.

तळबीड (ता. कराड) येथे स्व. यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनेलच्या प्रचारार्थ ते बोलत होते. यावेळी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कारखान्याचे माजी संचालक रमेश मोहिते, गामपंचायत सदस्य राजेंद्र मोहिते, माजी उपसरपंच दादासाहेब मोहिते, अॅड. शशिकांत मोहिते, सुनिल मोहिते, माणिक पाडळे, सुभाष गायकवाड, विकास यादव, बाबा माने, विलास गायकवाड, संजय चव्हाण, सयाजीराव मोहिते, सुजय मोहिते, शालिनीताई गुणवंत, महादेव गायकवाड, सुधाकर तुपे, प्रकाश मोहिते, रमेश मोहिते, सिद्धार्थ भोसले, संजय घोरपडे, संपतराव जाधव, अशोकराव चव्हाण, भास्कर पवार, महेशबाबा जाधव, तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. घोरपडे म्हणाले, इरिगेशन संस्थाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या दबावात आता कुणीही राहण्याची गरज नाही. उलट इरिगेशन संस्थाना आपण अधिक उर्जितावस्था मिळवून देवू, असा विश्वास व्यक्त करत कराड उत्तरचा पाणीप्रश्न सोडवणे हा माझ्या कामाचा प्रमुख अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, आज मी अपघाताने आमदार झाल्याची टीका केली जाते. परंतु, कराड उत्तरमधील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी साडेतीन महिन्यात काम केले. तुम्ही पंचवीस वर्षांत काय केले? एकतरी नाव सांगा. सह्याद्रि हा महाराष्ट्रात नावाजलेला कारखाना. पण तुमच्यावरच कारखाना वाचवायला पाहिजे असं, म्हणण्याची वेळ आली. कारखाना अडचणीत आणला कोणी? तुम्ही अमर्याद सत्ता वापरून स्वतःचे घर भरलं, कामगारांचा वैयक्तिक कामासाठी गैरवापर केला. कारखान्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असून विद्यमान चेअरमनांनी 40 वर्षांत 70 ते 80 कोटी स्वतःच्या कुटुंबावर उडवले असल्याचा आरोप आ. घोरपड यांनी यावेळी केला.

ऊस जाण्याच्या बाबतीत एकही शेतकरी, सभासद समाधानी नाही.  फक्त चेअरमन व त्यांचे कुटुंब समाधानी आहे. सगळ्यांची लूट करून राजकारणात पैसा वापरला. विधानसभा निवडणुकीत जनतेने यांना दाखवून दिले आता कारखान्यात बदल करायचाय असे प्रत्येक सभासदाची म्हणणे आहे. पाणी संस्थेच्या माध्यमातून सभासदांवर दबाव टाकला जातो अधिकार त्यांना दिला कोणी. इरिगेशन योजनांसाठी तुमचे योगदान काय दरवर्षी इन्स्पेक्शनच्या नावाखाली दोन लाख रुपये फी घेऊन जाता. मात्र 40-50 वर्षात इरिगेशन संस्थांमध्ये नवीन टेक्नॉलॉजी बाबत सकारात्मक विचार का केला नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन मधून १६ तासांची लाईट योजनांना दिली मात्र यांच्याकडे लोक गेले असता यांनी 70-80 लाख रुपये घेऊन या असे सांगितले. पण येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना 24 तास लाईट देता येईल असे नियोजन करू असे आमदार घोरपडे म्हणाले. कारखान्याच्या सर्व पाणीपुरवठा योजनांना ऊर्जेत अवस्था येण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यासेच कारखान्यात सत्तांतर झाल्यावर ए टू झेड टंग्याचा बंदोबस्त केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सह्याद्रि कारखान्याचे माजी संचालक रमेश मोहिते, अॅड. शशिकांत मोहिते, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.

 

Related Articles