आयुष्यमान स्पेशलमनोरंजनसातारा जिल्हा

नवसाक्षरांची पायाभूत साक्षरता चाचणी, परीक्षेसाठी नवसाक्षरांचा उत्साह शिगेला 

गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन नवसक्षरांच्या परीक्षेचा आढावा

 

 ओगलेवाडी/ प्रतिनिधी :-

कराड तालुक्यातील 2869 नवसाक्षरांनी रविवार दि.23 मार्च रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी दिली. 15 वर्षांपुढील अशिक्षित लोकांसाठी वर्षभर साक्षरता कार्यक्रम राबवला होता.आज या नवसाक्षरांनी लहान मुलांप्रमाणे परीक्षेचा अनुभव घेतला.या परीक्षार्थींचा उत्साह या परीक्षेवेळी शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे.याच कार्यक्रमांतर्गत कराड तालुक्यामध्ये 2869 निरीक्षरांची नोंदणी करण्यात आली होती.या सर्व निरीक्षणांना निरक्षरांना वर्षभर स्वयंसेवकांमार्फत अध्ययन अध्यापन केले होते.जिल्हा परिषदेमार्फत आणि पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनानुसार या निरक्षर लोकांना स्वयंसेवकांच्या मदतीने लेखन,वाचन,संख्याज्ञान असे साक्षरतेसाठी आवश्यक असलेले ज्ञान दिले जात होते.

या नवसाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी कराड तालुक्यात पार पडली.यासाठी प्रत्येक शाळेमध्ये परीक्षा केंद्र तयार केले होते.सर्व शिक्षक या केंद्रावरती निरीक्षक म्हणून नियुक्त केले होते.सकाळी 10 पासूनच ही परीक्षा सुरू झाली मात्र नवसाक्षर या परीक्षेच्या अगोदरच केंद्रावर हजर होते. लेखन साहित्या बरोबरच पेपर ठेवण्यासाठी पॅड पिण्यासाठी पाण्याची बॉटल या वस्तू घेऊन हे लोक केंद्रावर येत होते.अगदी लहान मुलांसारखे बाकावर बसून आपला पेपर सोडवण्याचा ते आनंद घेत होते. तीस वर्षापासून ते अगदी 70 वर्षापर्यंतच्या आजीबाई पेपर सोडवताना लहान मूल झाल्याचे पाहायला मिळत होते. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.शिक्षण विस्तार अधिकारी जमिनी मुलाणी, नितीन जगताप,सन्मती देशमाने,रमेश कांबळे,सुलभा लाड यांच्यासह गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन नवसक्षरांच्या परीक्षेचा आढावा घेतला. अतिशय उत्साहात मोठ्यांनी लहान मुलांसारखा उत्साह दाखवत या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता. शिक्षणाविषयीची आवड आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांचा उत्साह पाहून दिसून येत होते.काही कारणामुळे शिक्षण घेता आले नव्हते ते या वयात घेता घेण्याची संधी मिळाली आणि आपण साक्षर झालो याचा आनंद गगनात मावत नव्हता.आणि या साक्षरांच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी रमेश कांबळे व केशव चौगुले यांनी काम पाहिले.

 

आजीबाई ही झाल्या वय विसरून विद्यार्थी.

आजच्या नव साक्षर परीक्षेसाठी पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची संख्या जास्त होती.या वयोवृद्ध लोकांना आपल्यापेक्षा कमी वयाची मुले मार्गदर्शन करीत होती.आज आपल्या नातवांच्या शाळेमध्ये परीक्षा देण्यासाठी हे वयोवृद्ध विद्यार्थी बनून आले होते. रोज नातवाला सोडायला येणाऱ्या आजीबाईंना आज नातू शाळेत घेऊन आला होता आणि परीक्षेला बसवून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होता.हे अनोखे दृश्य या परीक्षेच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

 

नवसाक्षरांच्या परीक्षेला गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांनी भेट दिली. (छाया-संदीप कोरडे)

Related Articles