सातारा जिल्हाहोम

समग्र शिक्षा अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा 

सातारा/प्रतिनिधी : – 

समग्र शिक्षा अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांनी मंगळवार, 4 मार्चपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास मंगळवार पासूनच मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आलेला आहे.

सर्व शिक्षा अभियान तसेच समग्र शिक्षा योजना अंतर्गत 2002 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात, जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा, तालुका व महानगर पालिका स्तरावर सहायक कार्यक्रमाधिकारी, विषय साधन व्यक्ती, कनिष्ठ अभियंता, डाटा, एमआयएस कोऑर्डिनेटर, दस्तऐवज व संशोधक सहायक व वरिष्ठ लेखा सहायक अशा पदांवर कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी उच्च पदवीधारक बीई, एमएससी बीएड अशा उच्च शैक्षणिक पात्रताधारक आहेत. या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक जाहिरात देऊन बिंदुनामावली, लेखी परीक्षा, मुलाखत अशी कार्यपद्धती अवलंबून झालेली आहे.

हे कंत्राटी कर्मचारी 18 ते 20 वर्षापासून, शाळा बांधकामे, शिक्षकांना अध्यापन, शालेय शिक्षणविषयक प्रशिक्षण, शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन, शाळा भेट करून आदर्श पाठ घेणे, विद्यार्थी मार्गदर्शन तसेच शासनाच्या शिक्षणविषयक योजना राबविणे अशी कामे अत्यंत तुटपुंज्या मानधनावर करत आहेत. त्यांची नवीन नोकरी मिळण्याची वयोमर्यादाही संपलेली आहे. 18 ते 20 वर्षापासून उपोषण आंदोलन व मोर्चाद्वारे वारंवार प्रश्न शासन दरबारी मांडले गेले. परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचे निर्णय या बाबतीत घेतल्या गेल्या नाहीत. तसेच मानधनाव्यतिरिक्त शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक लाभ योजना किंवा लाभ कायम कर्मचाèयांप्रमाणे त्यांना मिळालेला नाही. समग्र शिक्षा योजनेतील काही कर्मचाऱ्यांना 8 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाद्वारे सेवेत कायम केले आहे. तर काही कर्मचारी अजूनही सेवेत नियमित होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

… तर, स्वेच्छामरणाची परवानगी द्या !

परवानगी नाहीतर स्वेच्छामरण परवानगी द्या समग्र शिक्षा विभागातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे त्यांच्या अहर्ता, त्यांच्या व्यावसायिक पात्रतेनुसार शिक्षण किंवा इतर कोणत्याही विभागात त्यांचे समायोजन करण्यात यावे किंवा त्याच पदावर सेवेत नियमित करण्यात यावे. ही अट मान्य होत नसेल तर कंत्राटी सेवापूर्तीच्या 58 व्या वर्षानंतर आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

Related Articles