सातारा जिल्हाहोम

पुनर्वशीत गावांना नागरी सुविधा पुरविणार – आ. मनोज घोरपडे

जिल्हाधिकारी यांच्यासमवेत पुनर्वसन संदर्भात आढावा बैठक

कराड/प्रतिनिधी : –

पुनर्वशीत ३३ गावांचे पुनर्वसन होऊन २५-३० वर्ष उलटली, तरीही या गावांना नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. या संदर्भात नागरी सुविधांचा कृती आराखडा तयार करून प्राधान्यक्रमाने काम पूर्ण करणार असल्याचे आ. मनोज घोरपडे यांनी सांगितले.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पुनर्वसन झालेल्या ३३ गावांच्या सरपंच, उपसरपंच व गावातील प्रमुख मंडळींची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आ. मनोज घोरपडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्याधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी श्री गलांडे, पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांची उपस्थिती होती.

या बैठकीत आ. घोरपडे यांनी बाधितांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून सदरच्या पुनर्वसनाबाबतचा आढावा घेतला.

आ. घोरपडे म्हणाले, तारळी, कण्हेर, धोम, उत्तरमांड व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आदींमुळे बाधित झालेल्या गावांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना सर्व सुविधा पुरवण्यात येतील. याचबरोबर काही गावांचे हस्तांतरण महसूल विभागात करण्याचे सुद्धा नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अदिती भारद्वाज, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, धीरज जाधव, संदीप काटे, धोंडीबा कोळेकर, दादासो काटे, अजित केंजळे, पांडुरंग साळुंखे, रामदास बाबर, नितीन जाधव, बाबुराव चौधरी, दीपक संकपाळ आदी ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.

Related Articles