आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हा

कराड उत्तर च्या मतपत्रिकेवर कमळाचे चिन्ह मुळेच विजय

 "त्रिमूर्ती " ने कमळाचा इतिहास घडवला

कराड / प्रतिनिधी : –

सन १९९५ मध्ये कराड उत्तर मतदार संघाच्या मतपत्रिकेमध्ये कमळाचे चिन्ह शेवटचे पाहायला मिळाले होते. यानंतर तीस वर्ष या मतदारसंघातून हे चिन्ह गायब होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हे चिन्ह मतपत्रिकेवर पुन्हा आले. मनोज घोरपडे धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांच्या एकत्रित प्रयत्नाने कमळाने इतिहास घडवला.
कराड उत्तर हा माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचा अभेद्य किल्ला अशी महाराष्ट्रभर ओळख असलेला मतदारसंघ होता. या मतदारसंघात सलग २५ वर्षे बाळासाहेब पाटील यांची सत्ता होती.नेहमीच तिरंगी लढत त्यांना यश मिळवून देत होती.या वर्षी स्व.राजाभाऊ देशपांडे १९९५ आणि प्रदीप अधिकराव २००४ या निवडणूकी नंतर कमळ चिन्ह उत्तरेत मतपत्रिकेवर अवतरले.
हे चिन्ह आणि पक्ष तळागाळातील मतदारापर्यत पोहोचवण्यासाठी आ.मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, धैर्यशील कदम यांनी खूप कष्ट घेतले होते. या वेळी एकास एक लढत होईल याची खबरदारी भाजप श्रेष्ठींनी घेतली होती. रामकृष्ण वेताळ आणि धैर्यशील कदम यांनी माघार घेऊन स्वतालुक्यातून मोठ्या प्रमाणात आ.मनोज घोरपडे यांना मतदान करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे उत्तर चा बालेकिल्ला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या वर्चस्वातून बाहेर निघाला.
अशक्य असे काम सहज शक्य झाले. ३० वर्षानंतर कराड उत्तरेच्या मतपत्रिकेवर कमळ चिन्ह अवतरले जिंकले आणि मनोज घोरपडे विधानसभेत पोहोचले याची चर्चा सुरू झाली आहे.

रामकृष्ण वेताळ “किंगमेकर”

साडेचार जिल्हा परिषद गट आणि दीड लाख मतदार असलेल्या कराड तालुक्याने  मनोज घोरपडे यांना भरघोस मताधिक्य दिले आहे. यासाठी आ.मनोज घोरपडे आणि त्यांना लाभलेली वेताळ यांची समर्थन कामी आले आहे. वेताळ यांची तरूण वर्गात असलेली क्रेझने तरूणांचा प्रतिसाद वाढवला आहे. त्यामुळे रामकृष्ण वेताळ यांना उत्तरेचा किंगमेकर असा तरूणाईचा किताब मिळत आहे.

 

Related Articles