सातारा जिल्हाहोम

माजी मुख्यमंत्र्यांनी केलेले शाश्वत विकासकाम सांगावे – डॉ. प्रमोद सावंत

कराड येथे महायुतीचा डॉक्टर संवाद मेळावा संपन्न 

कराड / प्रतिनिधी : –

  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोक्रतिनिधी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणतेही शाश्वत विकासकाम केले नाही. केली असतील तर त्यांनी ती सांगावीत. 2014 ते 2024 पर्यंत भाजपच्या काळात कोणकोणती विकासकामे झाली, ती मी पुराव्यांनिशी दाखवतो. त्यांना कोणतेही ठोस शाश्वत काम करता आले नाही. त्यांच्या काळातील एकही प्रकल्प आज पूर्णत्वास गेलेला नसल्याचा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
महायुतीचे कराड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमधील डॉक्टरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले,
देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली या 60 वर्षांच्या काळात काँग्रेसने केवळ स्वतःसाठीच राज्य केले, देशाचा काय विकास केला? असा सवाल उपस्थित करत अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर 2014 ची 24 यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपची तुलना केल्यास विकास म्हणजे काय, हे कळेल.
ते म्हणाले, काँग्रेसने गरीबी हटवण्यासाठी कोणता कार्यक्रम राबवला. त्यांच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या 100 रुपयांसाठी त्यांना चार वेळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या. मात्र, त्यांच्या हातात केवळ 20 रुपयेच पडायचे. उरलेले 80 रुपये काँग्रेसचे दलाल खात होते. मोदींनी जनधन योजना, मोफत धान्य, किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत, किसान डेबिट कार्ड, सॉईल हेल्थ कार्ड, उज्वल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा लोन आदींच्या माध्यमातून गरीब कल्याण, तसेच महिला सशक्तिकरण आणि युवकांसाठी उद्योग व रोजगार निर्मिती केली. याउलट काँग्रेसने आतापर्यंत सर्वांना हात दाखविण्याचेच काम केले. त्यांनी कोणाच्याही हाताला काम दिले नाही. कराड मध्येही येथील लोकपरतिनिधींनीही कोणतीही रोजगार निर्मिती केली नाही. ते केवळ आश्वासने देत आहेत. त्यांचे आता वय झाले असून त्यांच्यासारख्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींना कराड दक्षिणच्या जनतेने रिटायर करावे. तसेच डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला विधानसभेत पाठवावे, असे आवाहनही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
डॉ. सुरेश भोसले, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची भाषणे झाली. या मेळाव्याला कराड दक्षिणमधील डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles