आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील – डॉ. अतुल भोसले
वडगाव हवेली येथे प्रचाराचा शुभारंभ
125 1 minute read

कराड / प्रतिनिधी : –
२०१९ च्या अपयशाने खचून न जाता निकालानंतर दुसऱ्या दिवसापासूनच काम सुरु केले. करोनाच्या लाटेत सर्वसामान्य माणसाला वाचण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठे प्रयत्न केले. सुरेशबाबांनी लोकांची अखंड सेवा केली. ही रुग्णसेवा देताना कुठलाही भेदभाव, राजकीय गट तट बघितला नाही. यापुढे सर्वसामान्यांचा विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन डॉ. अतुल भोसले यांनी केले.
वडगाव हवेली, ता. कराड येथे भाजप – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आ. आनंदराव पाटील, व्हा. चेअरमन जगदीश जगताप, माजी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, जयवंत पाटील, जयवंत शेलार, आप्पासाहेब गायकवाड, शेतीमित्र अशोकराव थोरात, माजी नगरसेवक सुहास जगताप, हणमंतराव पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अतुलबाबा म्हणाले, कराड दक्षिणच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षांच्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून मी ७४५ कोटींचा; तर मुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून २५० कोटींचा असा मिळून एकूण सुमारे १००० कोटींचा विकासनिधी आला आहे. यातील बहुतांश कामाचे भूमीपूजन, उद्घाटन व लोकार्पण आम्ही केले. १० हजार बांधकाम भांड्यांचे सेट वाटले. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ सामान्य माणसांपर्यंत पोहचविला. कराडच्या स्टेडियमसाठी ९६.५० कोटींचा निधी आणला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या खात्यावर ५ हफ्ते जमा केले. माजी मुख्यमंत्र्यांनी सर्व योजनांवर टीका केली. त्यांना स्वतःच्या घराभोवतीची झोपडपट्टी हटवता आली नाही. मला संधी मिळाल्यावर पाटण कॉलनीतील झोपडपट्टी हटवून येथील लोकांना पक्की घरे देण्याला पहिले प्राधान्य राहील, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, विरोधकांच्या हातून आत्तापर्यंत काहीही विकास झालेला नाही. गेल्या ७० वर्षात जे झाले नाही, ते भाजप सरकार आल्यानंतर या देशात झाले. येत्या काळात रोजगार निर्मितीसाठी मोठमोठे प्रकल्प येथे आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
कराडची ओळख लोक ठरवतील
डॉ. अतुलबाबांना कराड शहरातून किमान ८ ते १० हजाराचे लीड देणार आहोत. या निवडणूकीनंतर लोक ठरवतील कराडची ओळख कोण? असा टोला कराडचे यशवंत आघाडीचे व शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांनी लगावला.
निवडणुकीनंतर पाच वर्षे पृथ्वीराजबाबा फिरकत नाहीत
आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघात भरघोस, असे काहीच केले नाही. जत्रेतल्या देवाला जसे जत्रेदिवशी पालखीत घालून गावभर फिरवतात, तसे पृथ्वीराजबाबांना फिरवले की परत पाच वर्षे हे गायब होतात. ते परत फिरकत नाहीत, अशी टीका जगदीश जगताप यांनी केली.
125 1 minute read