आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाचे आर्थिक परिवर्तन घडवणार :आशिष दामले

कराड / प्रतिनिधी : –

ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना ताकद देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची राज्य शासनाने स्थापना केली आहे. ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात लाभ देऊन त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा आपला मानस असल्याचे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांनी सांगितले.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आशिष दामले आज (सोमवारी) प्रथमच कराड दौऱ्यावर आले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास व स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ.सोनल भोसेकर, भाजपा पदाधिकारी मुकुंद उर्फ शार्दुल चरेगांवकर, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सुरेन्द्र काळे, संजय भोसेकर,  ओंकार आपटे, प्रशांत कुलकर्णी, ॲड मिलिंद कुलकर्णी, शशांक शेंडे, अमित बुधकर, मनोज आचार्य ,नितीन शाळीग्राम, प्रशांत कुलकर्णी रमेश कुलकर्णी, पी डी कुलकर्णी बाई, गौरीताई निलाखे, विनिता पेंढारकर, शरयु माटे सुषमा काळे , अनघा कुलकर्णी, विशाखा कित्तूर यांची उपस्थिती होती.

आशिष दामले म्हणाले, इतर समाज घटकांप्रमाणे ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी ही अनेक वर्षाची ब्राह्मण समाजाची मागणी होती. युती सरकारने आमच्या मागणीला न्याय देत महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळावर माझी अध्यक्षपदी नियुक्ती करत मला कमी वयात काम करण्याची संधी दिली आहे. ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात ताकद देऊन त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा माझा मानस आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने पुणे-मुंबई या ठिकाणी येत असतात. त्यांच्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून वस्तीगृह उभारण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Related Articles