आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रहोम

कदम साहेबांमुळे संस्था चालवणं सोपं झालं : आमदार डॉ. विश्वजीत कदम

कडेगाव / प्रतिनिधी : –

कठीण काळात संस्था उभं करण्याचं काम स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब व वनश्री मोहनराव कदम दादांनी केलं. साहेबांनी विविध संस्थांची उभारणी करून ग्रामीण विकासाला चालना दिली. या विकासात सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचं योगदान मोठं आहे. या सूतगिरणीने राज्यात आदर्शवत काम केलं आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.कडेगाव येथील सागरेश्वर सहकारी सूतगिरणीच्या 34 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी माजी आमदार  मोहनराव कदम होते. यावेळी सूतगिरणीचे चेअरमन शांताराम बापू कदम, दीपक भोसले, भीमराव मोहिते, प्रकाश जाधव, डी. के. कदम, सुरेश थोरात, मधूनाना भोसले, विजय शिंदे, सागर सूर्यवंशी, सुनील पाटील उपस्थित होते.

आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, कदम साहेबांचे कर्तृत्व आणि व्यक्तित्वामुळे संस्थात्मक काम करताना सोपं जातं आहे. आपल्या भागात कापूस उत्पादन नसताना सूतगिरणी उभा करणं धाडसाचं होतं. हे धाडस साहेबांनी केलं आणि जिद्दीनं पुरं केलं. साहेबांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला. सागरेश्वर सूतगिरणीने राज्यात आदर्शवत काम केलं आहे.यात कर्मचारी वर्गाचं योगदान मोलाचं आहे. सूतगिरणीमुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी निर्माण झाली. सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्थांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मागील वीस-पंचवीस वर्षात बदलला. याचा फटका सहकारी संस्थांना बसत आहे.

अहवाल वाचन कार्यकारी संचालक ए. बी. चालुक्य यांनी केले. अंदाजपत्रक वाचन डी. ई. पवार यांनी केले. स्वागत, प्रास्तविक सूतगिरणीचे उपाध्यक्ष महेश कदम यांनी केले. आभार संचालक उदय थोरात यांनी मानले.

 

Related Articles