झुंजार माणसं मुलुखमातीमधून जिवंत राहिली – आ. बाळासाहेब पाटील
पत्रकार संपत मोरे यांच्या ’मुलुखमाती’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाला प्रा. हरी नरके स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान

कराड/प्रतिनिधी : –
मुलुखमातीमधून संपत मोरे यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील लढणारी माणसं पुढे आणली. उपेक्षित आणि झुंजार माणसं मुलुखमातीमधून जिवंत राहिली. ग्रामीण भागातील चांगल्या साहित्यकृतींचा सन्मान होणे गरजेचं आहे, असे मत राज्याचे माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (कराड) यांच्यावतीने देण्यात येणारा प्रा. हरी नरके स्मृती साहित्य पुरस्कार पत्रकार व लेखक संपत मोरे यांच्या ’मुलुखमाती’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाला आ. पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, अध्यक्ष प्रमोद तोडकर, माजी अध्यक्ष संजय तडाखे, सचिव हरी बल्लाळ, जगन्नाथ चव्हाण, भास्कर तडाके, सुरज घोलप, जयवंत सकटे, कुमारी जाई प्रकाश, शंकर अवघडे व शाहू वायदंडे यांची उपस्थिती होती.
Show quoted text