भाजपचे महाविकास आघाडीविरोधात कराडमध्ये आंदोलन
किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेचे राजकारण करत असल्याचा आरोप

कराड/प्रतिनिधी : –
किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेचे महाविकास आघाडीकडून राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कराडमध्ये आंदोलन करण्यात आले. येथील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रविवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आले.
राजकोट येथे महाराजांचा पुतळा उभारला त्यावेळी महाविकास आघाडीतील कोणीही नेता तिकडे फिरकला नव्हता. पुतळा दुर्घटनेनंतर मात्र माविआचे एकामागून एक नेते राजकोटला जात आहेत, मोर्चे काढत आहेत. तसेच भग्न पुतळ्याच्या अवशेषांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत या माध्यमातून शिवप्रेमींमध्ये व्देशाची भावना निर्माण करत असल्याचा आरोपही यावेळी भाजपच्या नेत्यांनी केला.
या आंदोलनात भाजपचे सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सचिव भरत पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सुनील शिंदे, मानसिंग कदम, शंकर पाटील, शहाजी पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, कराड तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, अजय पावसकर, विष्णू पाटसकर, प्रशांत कुलकर्णी, रुपेश मुळे, सोपान तावरे, राजेंद्र खोत, किसन चौगुले, विश्वनाथ फुटाणे, सागर लादे, विवेक भोसले, मुकुंद चरेगावकर, विशाल कुलकर्णी, स्वाती पिसाळ, नम्रता कुलकर्णी, धनश्री रोकडे, कविता माने, सीमा घारगे, डॉ. सारिका गावडे, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.