सातारा जिल्हाहोम

पर्यावरणाचे रक्षण करून मानवी जीवन सुरक्षित करूया – सिताराम कोळेकर

कन्याशाळा, मलकापूर व नांदलापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरावर वृक्षारोपण व बीजारोपण 

कराड/प्रतिनिधी : –

सध्या मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. याचे भविष्यकालीन धोके लक्षात घेऊन सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करून मानवी जीवन सुरक्षित करायला हवे, असे प्रतिपादन विज्ञान शिक्षक व पर्यावरण प्रेमी सिताराम कोळेकर यांनी केले.

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा, मलकापूर व नांदलापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बिरोबा मंदिराच्या परिसरातील डोंगरावर वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रम राबवून विद्यार्थिनी, शिक्षक व नांदलापूर ग्रामपंचायत सदस्यांनी डोंगर परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, नांदलापूर ग्रा. पं. सरपंच मानसिंग लावंड पर्यवेक्षक सुरेश राजे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थिनींनी संकलित केलेल्या बिया टोकून आंबा, तुळस, चिंच, कडुलिंब, सुबाभूळ फणस, चिक्कू, सीताफळ, हेळा अशा वृक्षांची रोपे लावली. ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आले.

Related Articles