सातारा जिल्हाहोम

कोयना धरणात 100 टीएमसी पाणीसाठा 

धरणाच्या सहा वक्र दरवाजातून नदीपात्रात 12,4555 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू 

कराड/प्रतिनिधी : – महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीसाठ्याने शंभरी पार केली असून धरणात 100.38 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरण पाणीसाठा पाणलोट क्षेत्रात पावसाच संततधार असल्याने धरणाची वाढती जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून नदीपात्रात 12, 4555 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत असून धरण 95 भरले आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी 5 टीएमसी पाणीसाठा आवश्यक आहे.

कोयनानगर येथे गत 24 तासांत 136 मिमी, नवजा 139 मिमी, महाबळेश्वर येथे 142 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 38, 271 क्युसेक झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ होवून ती 98.89 टीएमसी झाली होती. दिवसभर पाणलोट क्षेत्रात कोयनानगर येथे 36/4806 मिमी, नवजा येथे 55/5685 मिमी, महाबळेश्वर येथे 75/5482 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 41265 क्युसेक  झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्याने शतकाचा टप्पा ओलांडला आहे. धरणाची जलपातळी 2159,9 फुट झाली असून धरणात 100.38 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी पाच टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे.

Related Articles