मलकापुरातील स्मशनभूमीतील विविध समस्या मार्गी लावा
नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; अपूर्ण काम पुर्ण करण्याचीही मागणी

कराड/प्रतिनिधी : –
मलकापूर शहरातील आगाशिवनगर येथील स्मशानभूमीचे अपुर्ण राहिलेले काम पुर्ण करण्यात यावे. व तसेच लक्ष्मीनगर येथील स्मशानभूमीत पडलेले खड्डे बुजवण्यात यावेत. त्याचबरोबर अन्य सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी आगाशिवनगर व लक्ष्मीनगर येथील मलकापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे मलकापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांना देण्यात आले.
यावेळी मलकापूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रशांत चांदे, मोहन पोळ, हणमंत शिंगण, जयंत कुराडे, संभाजी रैनाक, अर्जन जगदाळे, अमर इंगवले, सागर जाधव, ओंकार पलंगे, धनंजय येडगे, योगेश सुतार, शामराव देवकर, विजय डोंगरे, सागर पवार, जयवंत करंजे, सचिन जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, मलकापूर शहरातील आगाशिवनगर येथील सर्व्हे नं. 164/2/2 मधील स्मशानभूमीचे काम अपुर्ण आहे. ते पुर्ण करण्यात यावे. तसेच लक्ष्मीनगर येथील स्मशानभूमीत खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहत आहे. तसेच याठिकाणी शेवाळे साचून घसरण निर्माण झाली आहे. त्यामुळे खड्डे भरून स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात यावी. तसेच स्मशानभूमीची सुधारणा करणेची आवश्यक आहे. त्याचबरोबर स्मशानभूमी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना सूचना करण्यात यावी, अशी मागणी मलकापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चांदे यांनी केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी याप्रश्नी सकारात्मकता दर्शवत सदरच्या समस्या मार्गी लागण्याचे आश्वासन दिले आहे.