शेकापचे 2 व 3 ऑगस्टला पंढरपूरमध्ये राज्यव्यापी अधिवेशन
कोल्हापूर विभागीय मेळावा; पक्षाच्या पाच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

कराड/प्रतिनिधी : –
शेतकरी कामगार पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या 2 व 3 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे होणार आहे. त्या संदर्भात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांचा विभागीय मेळावा सोमवारी कोल्हापूर येथे पार पडला.
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार भाई जयंत पाटील होते. त्यांनी सदरच्या राज्यव्यापी अधिवेशनाची रूपरेषा सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच भाई उमाकांत राठोड यांनी पक्षाचा अजेंडा व अधिवेशनासंदर्भात मार्गदर्शन केले. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत असताना अॅड. भाई समीर देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. भाई लगारे (सर) यांनी केले. भाई बाबासाहेब देवकर यांनी आभार मानले. याप्रसंगी पाच जिल्ह्यांतून शेतकरी कामगार पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.