राज्य सरकार हद्दपार करून, महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त बनवण्याची गरज – खा. सुप्रिया सुळे

कराड / प्रतिनिधी :-
महाराष्ट्रातील एमबीबीएस म्हणजे महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी सरकार हद्दपार करून पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र बनवण्याची गरज आहे. महागाई, बेरोजगारीमुळे जनता अडचणीत आहे. आपले सरकार आल्यावर पहिल्यांदा शेतकऱ्याच्या दुधाला कांद्याला कपाशीला हमीभाव देण्याचा निर्णय घेईल, तसेच धोंड्याचे जेवण बंद करीन तसेच महिलांना पंधराशे रुपये साठी लाईनमध्ये उभे न करता त्यांचे फॉर्म घरी जाऊन भरून सन्मान देईन अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी सह्याद्रि साखर कारखान्यावर आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलताना दिली. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महिलांच्या भव्य मेळाव्यास मार्गदर्शन करताना बोलत होत्या अध्यक्षस्थानी कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील होते. माजी खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा संजना जगदाळे, माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या संगिता साळुंखे , माजी सभापती प्रणव ताटे, कराड उत्तर अध्यक्षा सुरेखा डुबल, कराड उत्तर अध्यक्ष देवराज पाटील, सहयाद्रीच्या उपाध्यक्षा लक्ष्मी गायकवाड, संचालक जशराज पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. खा. सुळे पुढे म्हणाल्या की मागीतले असत तर पक्ष चिन्हच काय ? सगळे दिले असते एकदा प्रेमान मागून बघितले असते. मी कधीच लढले नसते कशासाठी लढायचे, लढाईतून फक्त कटूता निर्माण होते. मला सांगितल असत पक्ष चिन्ह पाहीजे तर दिले असते व शून्यातून आयुष्य निर्माण केल असत. लाडकी बहीण काय ते मला विचारा कसली लाडकी माझ्यापेक्षा कुणालाच जास्त माहीत नाही. असा उपरोधीक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यशवंतनगर ता. कराड येथे विरोधकांना लगावला.
शरद पवार यांनी महीलांना आरक्षण दिल नसतं तर महिला बाहेर आल्या नसत्या आज सरपंचापासून जिल्हा परिषद पंचायत समिती, महापौर पर्यंत महीलाच आहेत. आरक्षणाच्या बाबत महिलांच कतृत्व व नेतृत्व बघून कौतुक केले. महिलांना निर्णय प्रक्रीयेत घेतल्यामुळे क्रांती घडली. महिलांनी १५०० रुपयाचा प्रत्येकीने फॉर्म भरा ते पैसे तुमचे आहेत त्यांच्या खिशातले नाहीत. आपण टॅक्स भरतो तेच पैशे आपणाला मिळणार आहेत सरकार उपकार करत नाही. आमच्या महीलांच्या हाताला काम मिळाले पाहीजे. १५०० रुपयाला विकत घ्यायला आम्ही ५० खोके नाही. साता-यात सत्ताधा यांनी पिपाणीचा रडीचा डाव खेळला ते रड के च आहेत. महाविकास आघाडीच सरकार आल्यावर पहिला निर्णय सरकार घेईल तो शेतक-याला हमीभाव देण्याचा, सरकारन परवा सांगितल की कोणीही मुलगा १२ वी पास झाला कि त्याला पुढील सहा महिने कोर्स करण्यासाठी ५००० रुपये शासन देईल सर्व योजना फसव्या आहेत सर्वांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. चिन्हासाठी थेट सुप्रीम कोर्टात केस दाखल आहे. एस.टी. नसल्याने महिलांना ५० टक्के सवलतीचा लाभ मिळत नाही.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले राज्यात शिंदे,फडणवीस सरकार आल्यापासून गुन्हेगारी वाढली आहे गृहखात्याचा वचक राहीला नाही यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषद सदस्य शहाजी क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, कार्यकारणी सदस्या संगिता साळुंखे, रूपाली यादव, संजना जगदाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत देवराज पाटील यांनी केले प्रास्तावीक शहाजी क्षीरसागर यांनी केले मेळाव्यास सुमारे १० हजार महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.