आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यासातारा जिल्हाहोम

पाणीप्रश्नावरून नागरिकांचा रास्ता रोकोचा इशारा

पालिकेच्या सर्वपक्षीय बैठकीत गोंधळ; पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न  

कराड/प्रतिनिधी : –

शहराच्या पाणीप्रश्नाबाबत नगरपालिकेत आयोजित करण्यात आलेय सर्वपक्षीय बैठकीत चांगलाच गोंधळ झाल्याचे दिसून आले. यावेळी नागरिकांनी आपापल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत न झाल्यास रास्तारोको करून कराडमध्ये येणारी सर्व वाहतूक रोखण्याचा इशाराही यावेळी संतप्त नागरिकांनी दिला आहे.

या बैठकीस प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी नगरसेवक हनुमंतराव पवार, विनायक पावस्कर, विद्याताई पावसकर, सुभाष पाटील काका, राजेंद्र माने आप्पा,विक्रम पावसकर, किरण पाटील ,शिवराज मोरे,महादेव पवार,सौरभ पाटील, अशोक पाटील, जयंत बेडेकर,मुकुंद चरेगावकर, शिवराज इंगवले मुख्याधिकारी शंकर खंदारे, ए. आर. पवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत अनेकांनी आपली मते मांडली. याप्रसंगी बैठकीत झालेली सर्व चर्चा प्रशासनास कळवून चार-सहा तासात हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले आहे.

प्रांताधिकारी म्हणाले, नदीतील वाहून गेलेली पाइपलाइन पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचरण करण्यात आले आहे. दोन-चार तासात ते कराडला पोहचून पाहणी करणार आहेत. नगरपालिका प्रशासनाने महामार्ग देखभाल विभाग, डी. पी. जैन कंपनीला सोबत घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच समाजास्याने जर हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर नाईलाजाने प्रशासनास यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल. जो कोणालाही परवडणार नाही, असा गर्भित इशाराही प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी यावेळी दिला आहे.

याप्रसंगी राजेंद्रसिंह यादव म्हणाले, जुने वॉटर हाऊस सुरू करून पाणीपुरवठा करणे हा पर्याय होऊ शकत नाही. दूषित पाणीपुरवठा अत्यंत घातक आहे. साथीच्या रोगाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देणे अवघड होईल. त्यादृष्टीने शाश्वत तोडगा काढावा.

सुभाषकाका पाटील यांनी वाहून गेलेली पाइपलाइन तात्काळ पूर्ववत करणे गरजेचे आहे. यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये नगरपालिका एकही पैसा घालणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान, नागरिकांनी अनेक समस्या प्रशासनासमोर उपस्थित केल्या. तसेच यांवर ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणीही केली.

Related Articles