सहकार निर्मितीतून यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली – आ. सदाभाऊ खोत
यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी केले अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सहकार क्षेत्राची निर्मिती करून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने विकासाची दिशा दिली, असे प्रतिपादन विधान परिषदेचे आ. सदाभाऊ खोत यांनी केले.
सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी रविवारी येथील प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, ज्येष्ठ नेते सुदाम चव्हाण, रयत क्रांतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. खोत म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला. तसेच त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि दाखवलेली विकासाची दिशा भविष्यकाळात पुढे चालवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी आम्ही माहितीच्या माध्यमातून सर्वाधिक प्रयत्न करणार आहोत. तसेच शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार गावगाडा यांच्या विविध प्रश्नांवरती काम करण्याचा दृष्टिकोन ठेवून विधान परिषदेच्या मिळालेल्या आमदारकीच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्नही करणार असल्याचे आ. खोत यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेचे आमदार म्हणून निवड झाल्याबद्धल रयत क्रांती संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजमाचीचे सरपंच शिवाजी डुबल, माजी जि. प. सदस्य सागर शिवदास, पार्लेचे उपसरपंच मोहन पवार, रयत क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दी आंबेकरी, तालुकाध्यक्ष विशाल पुस्तके, अशोक लोहार, नागराज शिंदे, अनिकेत ठोंबरे, भिकाजी पाटील, रघुनाथ नलावडे, विकास पवार, राजेंद्र पवार, मधुकर पवार, हेमंत पाटील, प्रसाद धोकटे, योगेश डुबल, संतोष घोलप, जय सूर्यवंशी व कार्यकर्ते, तसेच शेतकरी उपस्थित होते.