ताज्या बातम्यासातारा जिल्हा

धनगरवाडी- हणबरवाडी योजने साठी कराड उत्तर च्या आमदारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली- रामकृष्ण वेताळ

 

कराड/ प्रतिनिधी :-

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर व परिसरातील अनेक गावे गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळात होरपळत असताना कराड उत्तरचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील विधानसभेत इतकी वर्ष शांत का होते गेली २३ वर्षे आमदारांनी धनगरवाडी हणबरवाडी योजना पूर्ण का केली नाही ?आत्ताच आमदारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली? तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच पुढाकाराने धनगरवाडी हणबरवाडी योजनेला खऱ्या अर्थाने निधी उपलब्ध झाला आहे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विद्यमान आमदार आणि व त्यांच्या कार्यकर्त्यांनी करू नये असे मत भारतीय जनता पार्टी कराड उत्तर प्रचार प्रमुख रामकृष्ण वेताळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील गेली 23 वर्षे या विभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत पालकमंत्री असतानाही ही योजना आपल्या काळात का पूर्ण होऊ शकली नाही ?मसूरसह राजमाची, मेरवेवाडी, करवडी वाघेरी, वडोली(नि.), शहापूर रिसवड, अंतवडी, माळवाडी, यादववाडी, घोलपवाडी, वनवासनाची, निगडी, हणबरवाडी, वाण्याचीवाडी ही गावे अजूनही दुष्काळात त होरपळत असताना लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय केले.
भारतीय जनता पार्टी ने धनगरवाडी हणबरवाडी योजनेसाठी चांगला निधी मिळवून दिला असून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. रास्ता रोको करून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदारानी करू नये असे मत रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले.

Related Articles